देशात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लवकरच 'रामराज्य' येईल; जितेंद्र सरस्वती महाराजांचं मोठं वक्तव्य

आजही देशात अफजलखान प्रवृत्तीचे अनेक गद्दार वावरत आहेत.
Jitendra Maharaj Narendra Modi
Jitendra Maharaj Narendra Modiesakal
Summary

त्या गद्दारांना धडा शिकवण्‍यासाठी, हिंदू धर्म रक्षणासाठी सर्वांनी जात-पात, पक्ष, संघटना बाजूला ठेऊन एकत्र यावे,’’ असे आवाहनही त्यांनी केले.

वाई : देशातील जिहादी, आतंकवादी व दहशतवादी प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे विचार आचरणात आणावेत, असे आवाहन नाशिक येथील हिंदू आश्रमाचे पिठाधीश्वर जितेंद्र सरस्वती महाराज (Jitendra Saraswati Maharaj) यांनी केले.

येथील महागणपती घाटावर (सर सेनापती हंबीरराव मोहितेनगर) शिवप्रताप दिनानिमित्त (ShivPratap Din) प्रतापगड उत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी समितीतर्फे बाळकृष्ण ऊर्फ अप्पा परब (मुंबई) यांना ‘वीर जिवा महाले’ तर ॲड. राजीव देशपांडे (पुणे) यांना ‘पंताजीकाका बोकील अभिवक्ता’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Jitendra Maharaj Narendra Modi
छत्रपती शिवरायांचा लौकिक आणखी वाढणार! ऐतिहासिक विजयदुर्गात होणार 'आरमारी म्युझियम'; 'इतक्या' कोटींचा निधी मंजूर

यावेळी समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले, उपाध्यक्ष विनायक सणस, पंडितराव मोडक, अजय पावसकर, अनिकेत जवळकर, ॲड. नाझिया इलाहिखान, शारदाताई जाधव, कर्नसिंह मोहिते, नितीन भिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ShivPratap Din Wai
ShivPratap Din Waiesakal

जितेंद्र सरस्वती म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात लवकरच रामराज्य येईल. त्याची सुरुवात अयोध्येतील राम मंदिर उभारणीने होत आहे. आजही देशात अफजलखान प्रवृत्तीचे अनेक गद्दार वावरत आहेत. त्यांना धडा शिकवण्‍यासाठी, हिंदू धर्म रक्षणासाठी सर्वांनी जात-पात, पक्ष, संघटना बाजूला ठेऊन एकत्र यावे,’’ असे आवाहन त्यांनी केले.

Jitendra Maharaj Narendra Modi
अभिमानास्पद! कोल्हापुरातील प्रसिद्ध कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण'ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

यावेळी ॲड. नाझिया इलाहिखान यांनी मनोगत व्यक्त केले. सनातन धर्माच्या घर वापसी अभियानांतर्गत अंतर्गत हिंदू धर्मात प्रवेश केलेल्या मुलींनी आपल्या अनुभवाचे कथन केले. यावेळी शाहीर यशवंत जाधव (छत्रपती संभाजीनगर) व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा पोवाडा सादर केला. किल्ला स्पर्धा विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. समितीचे अध्यक्ष गणेश जाधव, पंकज शिंदे, प्रथमेश ढोणे, योगेश चंद्रस, स्वप्नील भिलारे, हिंदवी भाटे आदींनी स्वागत केले. मंदार खरे यांनी पुरस्कारकर्त्यांचा परिचय करून दिला. गणेश निगडे यांनी मानपत्र वाचन केले. आनंद पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.

Jitendra Maharaj Narendra Modi
Arjuna Award : साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! आदिती स्वामी, ओजस देवतळेला अर्जुन पुरस्कार जाहीर

छत्रपती शिवाजी महाराजांनी जगावे कसे, संभाजी महाराजांनी मरावे कसे, तर राणी ताराबाईने लढावे कसे? याची शिकवण दिली. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून अन्यायाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा मिळते. आपला देश, धर्म व संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने लढण्याची ताकद ठेवली पाहिजे.

-अप्पा परब, (वीर जिवा महाले, पुरस्‍कार विजेते)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com