farmer
farmer

सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला कृषीमंत्री! 

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात मालेगांव बाह्यचे आमदार दादा भुसे यांना कृषीमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून सर्वांच्या नजरेत पहिल्यांदा येणाऱ्या या खात्याची जबाबदारी शिवसेनेच्या दादा भुसेंकडे असणार आहे.

दादा भुसे यांनी युती सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. आता त्यांना कॅबिनेट मंत्रीपदावर बढती मिळाली. तसेच त्यांच्याकडे कृषी मंत्रीपदासारखी  जबाबदारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली असून, शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याची मोठी जबाबदारी भुसे यांच्याकडे असणार आहे.

नाशिक जिल्ह्यात दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांसह सरोज आहिरे यांच्या नावाची चर्चा होती मात्र या सर्व मागे टाकून भुसे यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळविले होते. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक सहा जागांवर बाजी मारली होती. त्यामुळे मंत्रिमंडळात राष्ट्रवादी पक्षाकडून कमीतकमी एखादे राज्यमंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. 

दादा भुसे ठरले वजनदार नेते 
आमदार दादा भुसे हे सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना राजकीय पार्श्‍वभूमी नव्हती. त्यांच्या मतदारसंघात हिरे घराण्याचे राजकीय ताकद असताना त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. सलग चौथ्यांदा विजयी झाल्यानंतर कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळालेले भुसे आता कृषीमंत्री झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com