Sugar Factory : राज्यातील १०२ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त; आतापर्यंत ८१४ लाख टन उसाचे गाळप

राज्यात यंदाच्या गळीत हंगामात चार मार्चअखेर एकूण २०० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला.
Sugar Factory
Sugar Factorysakal
Updated on

माळीनगर - राज्यात यंदाच्या गळीत हंगामात चार मार्चअखेर एकूण २०० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. या साखर कारखान्यांनी ८१४.९२ लाख टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत ७६४.३३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.३८ टक्के इतका आहे. राज्यातील एकूण १०२ साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम समाप्त केला आहे.

कोल्हापूर विभागात ४० कारखाने कार्यरत असून त्यामध्ये २६ सहकारी आणि १४ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी १९८.५८ लाख टन उसाचे गाळप केले असून, २८१.६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागात राज्यातील सर्वाधिक ११.०१ टक्के साखर उतारा आहे. विभागातील २२ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.

पुणे विभागात ३१ कारखाने कार्यरत असून त्यामध्ये १८ सहकारी आणि १३ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या विभागात १९१.०६ लाख टन उसाचे गाळप झाले असून साखर उत्पादन १८१.३३ लाख क्विंटल झाले आहे. साखरेचा उतारा सरासरी ९.४९ टक्के आहे. या विभागातील १२ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.

सोलापुर विभागात ४५ कारखाने कार्यरत असून यामध्ये १७ सहकारी आणि २८ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी १२९.८५ लाख टन उसाचे गाळप करून १०५.१९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विभागाचा साखर उतारा ८.१ टक्के आहे. विभागातील ४१ साखर कारखान्यांचा हंगाम समाप्त झाला आहे.

अहिल्यानगर विभागात २६ कारखाने कार्यरत असून त्यापैकी १४ सहकारी आणि १२ खासगी आहेत.या कारखान्यांनी १०८.७६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. एकूण ९५.४२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून साखर उतारा ८.७७ टक्के आहे. या विभागातील ६ साखर कारखान्याचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात २२ कारखाने कार्यरत असून त्यामध्ये १३ सहकारी आणि ९ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी ७८.५५ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यांनी ६२.१३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा उतारा ७.९२ टक्के आहे.

या विभागातील १० साखर कारखान्याचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे. नांदेड विभागात १० सहकारी आणि १९ खासगी अशा एकूण २९ कारखान्यांनी ९४.९४ लाख टन उसाचे गाळप केले असून ९.६ टक्के साखर उताऱ्यासह ९१.१२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागातील ११ साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे.

अमरावती विभागात ४ साखर कारखान्यांनी १०.२२ लाख टन उसाचे गाळप केले असून ९.०४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा उतारा ८.८४ टक्के आहे. नागपूर विभागात ३ खासगी कारखाने सुरू असून त्यांनी २९८ लाख टन उसाचे गाळप करून १.५३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा राज्यात सर्वात कमी ५.१ टक्के इतका आहे.

हंगाम संपलेले विभागनिहाय कारखाने

कोल्हापूर - २२

पुणे - १२

सोलापूर - ४१

छत्रपती संभाजीनगर - ६

अहिल्यानगर - १०

नांदेड - १२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com