Sugar Industry : राज्यातील २५ कारखान्यांची धुराडी बंद..! गाळप अन्‌ साखर उत्पादनात घट

Maharashtra Agriculture : यंदाच्या हंगामात साखर गाळप आणि उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे. विशेषतः सोलापूर विभागातील २१ कारखाने बंद झाल्याने हंगाम गतवर्षीच्या तुलनेत तीनपट वेगाने संपत असल्याचे चित्र आहे.
Maharashtra Agriculture
Maharashtra AgricultureSakal
Updated on

पुणे : गाळप आणि साखर उत्पादनात यावर्षीचा हंगाम मागे पडला आहेच; पण त्याबरोबरच आता कारखान्यांचे गाळप पूर्ण होऊन बंद होण्याचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत जवळपास तीनपट आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत केवळ नऊ कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले होते. यावर्षी २५ कारखाने बंद झाले आहेत. यामध्ये २१ कारखाने केवळ सोलापूर विभागातील आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com