

लातूर : ‘‘शेतकऱ्यांना कर्जमाफी ही महायुतीतील भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तीन पक्षांच्या संयुक्त जाहीरनाम्यातील घोषणा आहे. या घोषणेपासून आम्ही ‘यू टर्न’ घेतलेला नाही. जाहीरनाम्यातील सर्वच घोषणा टप्प्याटप्प्याने नक्की अमलात येतील. त्याबाबतची राज्य सरकारची कार्यवाही सुरू आहे,’’ असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी येथे दिले.