

खोक्या प्रकरणावरून बिश्नोई गॅंगच्या माध्यमातून हत्येचा कट रचण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत आमदार सुरेश धस यांनी एकच खळबळ उडवून दिली. सरकारनामाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पत्रकार विलास बडे यांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यानंतर ही बाब प्रचंड व्हायरल झाली. सुरेश धस यांच्याकडून बेछूट आणि तथ्यहीन आरोपांनंतर पत्रकार विलास बडे यांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा देताच धस यांनी घुमजाव केले आहे.