Uddhav Thackeray: आता भाजपला ‘चित्ता सरकार’ म्हणायचं का?’;उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

प्रताप सरनाईक यांच्यावर देखील निशाणा साधला आहे
Uddhav Thackeray: आता भाजपला ‘चित्ता सरकार’ म्हणायचं का?’;उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
Updated on

भारतात 70 वर्षांनी चित्ता आणण्यात आला आहे. यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे. सत्तर वर्षानंतर भारतात प्रथमच चित्ता आल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजपाला खोचक टोला लगावला आहे.

आज अनेक वर्षांनी आपल्या देशामध्ये चित्ता हा प्राणी आला आहे. मराठीमध्ये आपण त्याला चित्ता बोलतो आणि इंग्लिशमध्ये चिता बोलतात. आम्ही पेंग्विन आणले म्हणून ते आम्हाला पेंग्विन सरकार म्हणतात. मग आम्ही त्यांना चित्ता सरकार म्हणायचे का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे.

दरम्यान त्यांनी यावेळी प्रताप सरनाईक यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. प्रताप सरनाईक यांची केस लोकशाहीपेक्षाही मोठी आहे. मग केस मागे घेण्याची घाई का? असा सवालही ठाकरे यांनी विचारला आहे. प्रताप सरनाईक शिंदे गटासोबत गेल्याने शिंदे सरकार त्यांची केस मागे घेण्याची घाई करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com