cm devendra fadnavis, bhagat singh koshyari and ajit pawar
sakal
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूने महाराष्ट्रातील जनतेची अपरिमित हानी झाली आहे. त्यांनी १९८१-८२ या वर्षांत छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून राजकीय कारकिर्दीस सुरवात केली आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही.
ते चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ राजकारण, सहकार, अर्थकारण, कृषी, जलसंधारण, क्रीडा अशा विविध क्षेत्रांवर आपला अमीट ठसा सोडून गेले आहेत. आपल्या कृतिशीलतेने ‘कामाचा माणूस’ अशी बिरुदावली आणि पुरोगामी विचारसरणी त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत मिरवली.