मतदार याद्यांमध्ये घोळ होतोय,निवडणूक आयोग पक्षपाती भूमिका घेतोय अशा आशयाच्या तक्रारी महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयोगाला सूचित केले होते.परंतु सत्ताधीशांच्या हातच खेळण बनलेल्या निवडणूक आयोगाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. राहुल गांधींनी निवडणुकीची उघड केलेली वोट चोरी,नंतर आयोग म्हणतोय की शपथपत्र द्या...पण राज्यात महाविकास आघाडीने आणि देशात इंडिया आघाडीच्या अनेक घटक पक्षांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे अशा हजारो तक्रारी केल्या आहेत.पण आयोगाने त्यावर शांत बसण्याशिवाय काहीही केलेले नाही...! आज आयोग किती जरी नैतिकतेचा आव आणत असला तरी त्याची चोरी पकडली गेली आहे हे निश्चित..!