

CM Devendra Fadnavis
sakal
मुंबई - मुंबईतील नरिमन पॉईंट ते थेट विरारपर्यंत विविध पायाभूत सुविधांचा विकास आणि सुधारणा करण्यासाठी २४.३५ किलोमीटर लांबीचा उत्तन-विरार सागरी सेतू (सी-लिंक) आता वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोडरस्ता तयार करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील उत्तर-दक्षिण रस्ते जोडणी पूर्ण होऊन प्रवासात मोठी सुधारणा होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.