Karj Mafi: लाखो शेतकऱ्यांना मोठा धक्का! कर्जमाफी योजनेत थेट अपात्र; सरकारच्या तिजोरीतील पाच हजार कोटींची बचत

Farmer Loan Waiver Scheme : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून लाखो शेतकऱ्यांना वगळले आहे.
Farmer Loan Waiver Scheme

Farmer Loan Waiver Scheme

ESakal

Updated on

मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने'च्या अंमलबजावणीचा पहिला टप्पा सध्या वेगाने सुरू आहे. या प्रक्रियेत थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा दिला जात असतानाच, प्राप्तिकर भरणारे तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पदाधिकारी अशा सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेतून वगळले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीची सुमारे चार ते पाच हजार कोटी रुपयांची मोठी बचत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com