नागपूर - राज्यात गेल्या काही वर्षांपासून अकरावीचे प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. यंदा या पद्धतीत बदल करून राज्यातील ऑनलाइन प्रवेश होत असलेल्या शहरांची एकत्रित प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. मात्र, गेल्या वर्षी आठ शहरांमध्ये १ लाख ९७ हजारावर जागा रिक्त असतानाही शालेय शिक्षण विभागाकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा अट्टहास धरण्यात येत आहे.