मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या संभाव्य युतीच्या चर्चेचे घोंगडे भिजत पडलेले असताना शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ‘जनतेच्या मनात आहे, ते होईल,’ असे विधान केले..राजकारणातील ठाकरे ब्रँड एकत्र येण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल पुढे पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘युतीबाबतचे बारकावे आम्ही पहात आहोत. तुम्हाला थेट बातमीच देऊ,’ असे ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगत युतीबाबतची चाचपणी सुरु असल्याचे संकेत दिले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एप्रिल महिन्यात दिलेल्या एका मुलाखतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत भविष्यात एकत्र येण्याबाबतची शक्यता नाकारली नव्हती. त्याला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शिवसेना (ठाकरे)-मनसे युतीसाठी दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे..दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे परदेशात गेल्याने ही चर्चा पुढे गेली नव्हती. मात्र त्यानंतरही दोन्ही नेत्यांनी यावर जाहीरपणे वक्तव्य करणे टाळले होते. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते, खा. संजय राऊत यांनी मात्र या युतीबाबत दोन्ही नेते चर्चा करत असतील, असे मोघम उत्तर देत टोलवाटोलवी केली होती.आज मात्र यावर उद्धव ठाकरे यांनी मौन सोडल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेमधील युतीच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना, ‘जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल..तसेच मी तुम्हाला फक्त एका वाक्यात सांगितले याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही पाहत आहोत. तसेच मी तुम्हाला फक्त संदेश नाही तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये काहीही संभ्रम नाही. त्यामुळे माझे म्हणणे असे आहे की संदेश वगैरे देण्यापेक्षा जी काही बातमी द्यायची ती आम्ही देऊ’ असे जाहीर केले..उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे?मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ‘महाराष्ट्राच्या मनात काय आहे, ते आम्हाला माहिती आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे ते महत्त्वाचे असे सूचक विधान केले आहे. आमचा २०१४ आणि २०१७ चा अनुभव वेगळा आहे. उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकले तर राज ठाकरे १०० पावले पुढे येतील. उद्धव ठाकरेंकडून कोणताही अधिकृत प्रस्ताव आला तर त्यावर राज ठाकरेंकडून विचार केला जाईल, असेही देशपांडे म्हणाले..योग्यवेळी बोलेन - फडणवीसमुख्यमंत्री फडणवीस यासंदर्भात म्हणाले, की मी यावर काय प्रतिक्रिया देणार आहे? माझा काय संबंध येतो? यांनी साथ द्यायचीय आणि त्यांनी प्रतिसाद द्यायचा की नाही हे ते ठरवतील. आता तरी त्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काही आहे, असे मला वाटत नाही. त्यामुळे मी योग्यवेळी बोलेन. याविषयी उचितवेळी बोलेन..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.