Maharashtra Politics : शक्तीसमोर सक्ती अखेर हरली : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : मराठी एकजुटीच्या दबावामुळे हिंदी सक्तीबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात आला असून, ५ जुलै रोजी जल्लोषाच्या स्वरूपात सभा किंवा मोर्चा होणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSakal
Updated on

मुंबई : मराठीच्या मुद्द्यावर मराठी माणूस एकत्र येत होता. पण मराठी माणसाची एकजूट होऊ नये, अशीच या सरकारची भूमिका आहे. त्यामुळेच हिंदीबाबतचा शासन निर्णय रद्द केला. पण पाच जुलैला जल्लोषाचा मोर्चा किंवा सभा होईल. या आंदोलनात जे सहभागी होते त्या सर्वांशी चर्चा करून येत्या एकदोन दिवसात याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयानंतर स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com