कोरोना काळात कुणी काय केलं, चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला सवाल

कोरोनाकाळात केंद्रानं राज्यांना दिलेली व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रेमेडिसिव्हीर वगैरेही राज्य सरकारला गरजूंना धड देता आली नाहीत.
chandrakant patil
chandrakant patilsakal

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संसदेत म्हटल्याप्रमाणे देशाचे तुकडे पाहण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरुच आहे. महाराष्ट्र काँग्रेसला ही पंरपरा पुढे नेण्याचा आदेश हायमांडकडून मिळालाय का? कोरोनाकाळात कुणी काय केलं, याचे हिशोब महाराष्ट्रात अचानक कुणाच्या आदेशावरुन सुरु झाले आहेत?, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काँग्रेस व महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशात कोरोना पसरल्याची टोला त्यांनी सोमवारी लगावला होता.(Chandrakant Patil Attack On Mahavikas Aghadi Over Corona Situation Handling)

chandrakant patil
अजित पवारांच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध, पदाधिकाऱ्यांना अटक

पुढे पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, कोरोनाकाळात केंद्रानं राज्यांना दिलेली व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रेमेडिसिव्हीर, PPE किट वगैरेही मविआला गरजूंना धड देता आली नाहीत. आमचं दिल्लीतलं वजन वापरून मदत आणावी, अशा निर्लज्ज मागण्या तुम्ही केल्या. केंद्र काहीच देत नव्हतं? केंद्रानं जे दिलं, याचा लसीकरण हा बोलका पुरावा आहे. मुळात राज्यात कोरोनाशी लढाई सुरू असताना मविआ (Mahavikas Aghadi) कुठे होतं? पत्रकार परिषदा आणि फेसबुक लाइव्हपुरतं काही नेत्यांचं अस्तित्व होतं. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोलेंसह ट्विटरबाज होते कुठे? केंद्राची मदत आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं फील्डवर्क, अशी राज्याची कोरोनाशी लढाई होती, असे पाटील म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com