Election : गोंधळच गोंधळ! नांदेडमध्ये मतदारांना कोंडलं, अंबरनाथला बोगस मतदार आणले, तर कोपरगावात उमेदवारांमध्ये बाचाबाची

Election : राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. दरम्यान, काही ठिकाणी मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नांदेड, अंबरनाथ आणि कोपरगाव इथं धक्कादायक प्रकार घडले आहेत.
Maharashtra Municipal Elections Witness Clashes and Allegations

Maharashtra Municipal Elections Witness Clashes and Allegations

Esakal

Updated on

राज्यातील २३ नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये आज मतदान सुरू आहे. सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच या वेळेत मतदान होणार आहे. दरम्यान, काही ठिकाणी गोंधळ निर्माण झाल्याचे प्रकार घडले आहेत. अंबरनामथ्ये २०८ बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजपनं शिंदे गटावर केलाय. तर कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीच्या उमेदवारात बाचाबाची झाली. याशिवाय नांदेडमध्ये मतदारांना कोंडून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com