Vidhan Sabha 2019 : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून चिंतामुक्त करणार : उद्धव ठाकरे

Vidhan Sabha 2019 : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून चिंतामुक्त करणार : उद्धव ठाकरे

नारायणगाव : आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर शिवआरोग्य योजना मी देणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून चिंतामुक्त करणार असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तसेच चहूबाजूंनी विचित्र संकट घोंगवत आहे. त्यामुळे मी युती केली. मी भाजपसोबत गेलो, असेही ते म्हणाले.

नारायणगाव येथे आयोजित जाहीरसभेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, सत्तेच्या आसपास पोहचत नसल्याने विरोधकांकडून काहीही बोलले जात आहे. आम्ही चांगल्या योजना आणतोय तर तुम्ही आडवे का येत आहात, असा सवालही त्यांनी यावेळी केला. सरकारच्या अनेक योजनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो जरी असला तरी त्यामध्ये सिंहाचा वाटा हा शिवसेनेचा आहे. 10 रुपये जेवण आणि 1 रुपयात आरोग्य तपासणी ही करणार असा निर्धारही त्यांनी यावेळी केला.

शिवनेरी गडावर येणार

निवडणुका संपताच मी वाजत-गाजत शिवनेरी गडावर येणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

फक्त टीका करण्यासाठी निवडणूक नाही

ही निवडणूक फक्त टीका करण्यासाठी नाही. विरोधक काहीतरी बोलणार त्याला प्रत्युत्तर देणार मग ते त्यावर काहीतरी बोलणार. यासाठी ही निवडणूक लढत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com