Maharashtra weather : उत्तर भारतात शीत लहर, राज्यात थंडीचा कडाका वाढला वर्षाखेरीसपर्यंत हुडहुडी कायम राहणार

Maharashtra weather : उत्तर भारतात शीत लहर, राज्यात थंडीचा कडाका वाढला वर्षाखेरीसपर्यंत हुडहुडी कायम राहणार

Cold Wave Maharashtra : उत्तर व मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत किमान तापमान 10°C च्या खाली गेले आहे. नाशिक व पुण्यात 9°C, तर मराठवाड्यात 10–12°C दरम्यान तापमान नोंदले गेले. पुढील पाच दिवस राज्यात कोरडे हवामान व थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे.
Published on

उत्तर भारतात शीत लहर सुरु असल्याने महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गारठा अधिक वाढत आहे. पुढील दोन दिवस वाऱ्यांच्या दिशेत बदल होण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम तापमानावर होऊ शकतो.आज राज्याच्या बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. थंडीचा जोर राज्याच्या अनेक भागांत कायम राहणार आहे असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com