
‘जय भीम’ चित्रपटाने आपल्या अंतःकरणाला हादरे दिले. रजाकन्नूच्या कहाणीतून अन्यायाविरुद्धचा लढा, सामाजिक विषमता आणि पोलिस क्रूरतेचे विदारक सत्य डोळ्यांसमोर आले. तसाच एक थरकाप उडवणारा प्रसंग महाराष्ट्रातील परभणी येथे घडला. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण. हे प्रकरण केवळ कायदेशीर लढाई नाही, तर दलित समाजाच्या अस्तित्वाच्या लढाईचे प्रतीक आहे.
सोमनाथ सूर्यवंशीसाठी बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी न्यायासाठी झुंज दिली. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज (३० जुलै २०२५) ऐतिहासिक निकाल देत राज्य सरकारला दणका दिला. पण, ही कहाणी केवळ विजयाची नाही, तर त्या भावनिक आधाराची आहे, जी ‘जय भीम’मधील रजाकन्नूसारखीच सोमनाथच्या कुटुंबीयांना हवी आहे.