वाय बी चव्हाण सेंटर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र बनलं आहे. शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यापासून त्यानंतर आजवर घडत असलेल्या घडामोडी या सगळ्याचा साक्षीदार हे वायबी चव्हाण सेंटर आहे. या सेंटरचं नक्की काम काय? उद्देश काय? या सगळ्याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या...
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कृषी, औद्योगिक विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. सहकार क्षेत्र त्यांनी वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं.
त्यांच्या निधनानंतर २५ नोव्हेंबर १९८४ रोजी त्यांचं हे विविध क्षेत्रातलं काम पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांचे समर्थक, कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनीच १७ सप्टेंबर १९८५ मध्ये मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना केली. पुढे त्याचं नाव यशवंतराव चव्हाण सेंटर असं करण्यात आलं. यशवंतरावांचं पूर्ण नाव यशवंतराव बळवंतराव चव्हाण असं होतं. त्यामुळे या सेंटरला वायबी चव्हाण सेंटर असंही म्हणतात.
कार्यक्षेत्र
यशवंतराव चव्हाण सेंटर शिक्षण, आरोग्य, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करते. या सेंटरकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पाठ्यवृत्ती, पुरस्कारही दिले जातात. फिल्म फेस्टिवल्सही भरवले जातात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.