सेनेचा मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे संभाजीनगर केव्हा होणार? : देवेंद्र फडणवीस

'नामांतराबाबत दोन ओळींचा ठराव मंत्रिमंडळात का येत नाही ? '
Devendra Fadnavis Uddhav-Thackeray
Devendra Fadnavis Uddhav-Thackeraye sakal

मुंबई : आम्हाला प्रश्न आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे संभाजीनगर केव्हा होणार? नामांतराबाबत दोन ओळींचा ठराव मंत्रिमंडळात का येत नाही, असा सवाल करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. आज सोमवारी (ता.१४) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय चर्चेत ते बोलत होते. औरंगाबाद (Aurangabad) महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा पुढे आणला जात आहे. (When Will Aurangabad Rename As Sambhajinagar, Devendra Fadnavis Ask CM Thackeray)

Devendra Fadnavis Uddhav-Thackeray
'हिजाब गर्ल'च्या सत्कार कार्यक्रमास नाकारली परवानगी,वंचितची कोर्टात धाव

यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही ११ मार्च रोजी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नामांतराचा मुद्दा मांडला होता. ते म्हणाले होते, की औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तत्काळ पाठवावा. केंद्राने तो मंजूर न केल्यास मी निवडणूक लढविणार नाही, असा पण मुनगंटीवार यांनी व्यक्त केला होता.

Devendra Fadnavis Uddhav-Thackeray
खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे अशी अर्थसंकल्पाची अवस्था - देवेंद्र फडणवीस

आता मुख्यमंत्री ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देतात? यानंतर शिवसेनेची भूमिका काय असेल ? यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भाजप (BJP) व शिवसेना (Shiv Sena) हे दोन्ही पक्ष सत्तेत असताना त्यावेळीच औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर का करण्यात आले नाही?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com