जेव्हा आमिर खान घरी येऊन रडायचा, सिनेमे हातात असुनही संपत होतं करिअर

aamir khan
aamir khan

मुंबई- मिस्टर परफेक्शनिस्टच्या नावावर बॉलीवूडचा आमिर खान आज भारतातील टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. करिअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. आमिरने एक नाही, दोन नाही तर कित्येक अशा सिनेमांमधून त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आणि लोकांना आश्चर्यचकित केलं. 'कयामत से कयामत तक', 'दिल', 'तारे जमीन पर', '३ इडियट्स', 'दंगल' आणि 'पीके' सारखे जबरदस्त सिनेमे करुन त्यांने अनेकदा स्वतःला वेगळं सिद्ध केलं. नुकताच आमिर खान बेनेट युनिवर्सिटीच्या 'पदवीदान सभारंभ २०२०' मध्ये पोहोचला होता. आमिर या कार्यक्रमाचा मुख्या पाहुणा होता. या कार्यक्रमात त्याने विद्यार्थ्यांसोबतअनेक गोष्टी शेअर केल्या. सोबतंच त्याने त्याच्या करिअरची तुलना भांड्यात अडकल्यासारखी केली. 

आमिर खानने सांगितलं 'कयामत से कयामत तक'नंतर मी जवळपास कथेच्या आधारावर आठ, नऊ सिनेमे साईन केले. त्यावेळी दिग्दर्शक देखील नवीनंच होते. या सिनेमांनी बॉम्बफेक सुरु केली आणि मग मला मिडियाद्वारे 'वन फिल्म वंडर' म्हटलं गेलं मात्र माझं करिअर बुडत चाललं होतं. असं वाटलं की मी खूप घाईत आहे. मी खुप दुःखी होतो आणि घरी येऊन रडायचो.' त्याने सांगितलं की तो ज्या लोकांसोबत काम करत होता ते कामासाठी उत्सुक नव्हते आणि त्याला जाणवायला लागलं की त्याने त्या काळात जे सिनेमे केले ते चांगले नव्हते.

आमिरने सांगितलं की 'कयामत से कयामत तक'च्या पहिल्या दोन वर्षांमध्ये मी आयुष्यातील सगळ्यात कमजोर अवस्थेचा अनुभव घेतला. जे सिनेमे मी साईन केले होते ते एकानंतर एक रिलीज होऊन फ्लॉप व्हायला लागले. मी विचार केला की आता मी संपलोय.     

aamir khan recalled a time when his career was sinking and he would come home and cry  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com