सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात नेमकं काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यांची लव्हस्टोरी, ब्रेकअप, आवडीनिवडी याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा होतच असते. अभिनेता अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची लव्हस्टोरी अनेकांना ठाऊक आहे. एकेकाळी हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. इतकंच नव्हे तर या दोघांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र अभिषेक-करिश्माच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं.
अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा पार पडला होता. दोघांच्या लग्नाच्या पत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या. मात्र ऐनवेळी हा साखरपुडा मोडण्यात आला. यामागचं कारण अभिषेकची आई जया बच्चन होत्या असं म्हटलं जातं. २००२ साली अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशीच अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा करण्यात आला होता. पण आपल्या सुनेने लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम करू नये अशी जया बच्चन यांची इच्छा होती. मात्र करिश्माला लग्नानंतरही चित्रपटसृष्टीत काम करायचं होतं.
जया बच्चन यांच्या मागणीमुळे करिश्मा आणि त्यांच्या मतभेद निर्माण झाले आणि याच कारणामुळे दोन्ही कुटुंबातील संबंध बिघडले. परिणामी, हा साखरपुडा मोडण्यात आला. त्यानंतर करिश्माने २००३ मध्ये संजय कपूरसोबत लग्न केलं. तर अभिषेकने २००७ मध्ये ऐश्वर्या रायशी लग्नगाठ बांधली. करिश्माने १३ वर्षांच्या संसारानंतर संजय कपूरला घटस्फोट दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.