औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.२६) ३० जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४५ हजार ४६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी एकूण २१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६ हजार ८१६ झाली आहे. आजपर्यंत एकूण १२३३ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ११५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे.
शहरातील कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या) : जुना मोंढा (१), उल्का नगरी (१), एन वन सिडको (१), छावणी परिसर (१), मुकुंदवाडी (२), शिवशंकर कॉलनी (१), बीड बायपास (१), शिवाजी नगर (१), पुंडलिक नगर (२), हिंदी विद्यालय (१),चिकलठाणा (१), एन दोन सिडको (१), ओम गणेश नगरी (१), होनाजी नगर, हर्सुल (०१),सिडको (०१)
ग्रामीण भागात : (०४)
एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
घाटीत फुलंब्री तालुक्यातील जातेगावातील ७५ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
संपादन - गणेश पिटेकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.