औरंगाबादकरांची बॅनर लावून गांधीगिरी; पाणी, रस्त्यांची कामे करणाऱ्याला देणार मतदान!

Aurangabad Citizens Gandhigiri
Aurangabad Citizens Gandhigiri

औरंगाबाद : प्रत्येक वेळेस राजकारणी मंडळी विकासकामांचे, उद्घाटन व वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक चौकाचौकात व गल्लोगल्ली पाहायला लावताना दिसतात. खूपच बॅनरबाजी झाल्यास शेवटी महापालिका आदेश काढून ती काढून टाकते. अपवादात्मक स्थितीत कारवाई होते. पण शहरातील नागरिकांनी बॅनर लावणे हे लक्षवेधून घेते. तेही आपले रस्ते, पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी. असा प्रकार औरंगाबादेत घडला आहे.   


पाणीपुरवठा आणि खराब रस्‍त्यामुळे हैराण झालेल्या औरंगपुऱ्यातील धनमंडईवासीयांनी आपली खदखद थेट बॅनरच्या माध्यमातून मांडली आहे. जो कोणी उमेदवार गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेले पाणीपुरवठा आणि रस्त्यांची कामे २० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करेल, त्यालाच पूर्ण धनमंडईतील नागरिक मतदान करतील, असा आशय या बॅनरवर आहे. 


या बॅनरवर लिहिले आहे की, जो कोणी उमेदवार रस्ता, पाणीप्रश्‍न सोडवेल. त्यालाच मत देण्यात येईल. अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू किंवा आमचा प्रतिनिधी उभा करू, असा इशारा बॅनरवर दिला आहे. शनिवारी पहाटे हे बॅनर लावले असून, याची शहरभर चर्चा सुरू झाली आहे. धनमंडईवासीयांच्या नावाने लावलेल्या हे बॅनर काळ्या रंगात छापले असून, येथील नागरिकांची एक प्रकार खदखद यातून दाखविण्याचा प्रयत्न झाला आहे. 

Edited - Ganesh Pitekar
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com