गंगापूर, (जि. औरंगाबाद) : शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. रोज पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची संख्या वाढत आहे. यात व्यापाऱ्यांना नसलेले गांभीर्य, नागरिकांची बेफिकिरी वृत्ती, प्रशासनात समन्वयाचा अभाव, आरोग्ययंत्रणेवर पडत असलेला ताण या साऱ्या बाबींमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढते की काय, अशी भीती व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा लॉकडाउन करण्याची मागणी जोर धरत आहे.
गंगापूर शहर तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील लोकांची या-ना त्या कारणामुळे येथे सतत मोठी वर्दळ असते. शासनाने अनलॉक-१ करण्याच्या अगोदरपासून गंगापुरातील बाजारपेठ सुरू झाली. सुरवातीला सर्वच व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करण्याची हमी दिली; मात्र प्रत्यक्षात कोणताच व्यापारी व नागरिक नियमांचे पालन करताना दिसून येत नाही.
भाजी-बाजारात पहाटे भाजी खरेदीला सुरू झालेली गर्दी सायंकाळपर्यंत कायम असते. प्रत्येक दुकानासमोर गर्दी दिसत आहे. यामध्ये जवळपास पन्नास टक्के लोक विनामास्क असतात.
सोशल डिस्टन्स पाळला जात नाही. व्यापारीदेखील काळजी घेत नाहीत. दुकाने पाच वाजता बंद करण्याचा नियम आहे; मात्र तीही सायंकाळी सहा-साडेसहापर्यंत सुरू असतात. गर्दीमुळे भाजीपाल्याचे लिलाव बंद करून शहरात फिरून भाजी विक्री करण्याचा नियम केला आहे; मात्र अनधिकृतपणे शहरात पाच ते सात ठिकाणी प्रचंड गर्दी भाजीसाठी झालेली असते. याकडे
कोणाचेच लक्ष नाही. पोलिस त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत.
कोरोनाला हरवायचे असेल तर सामाजिक अंतर राखा. मास्कचा वापर करा. हे गरजेचे आहे. समोर उभा असलेला प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित आहे असे समजून आपण जर प्रत्येक व्यक्तीपासून तीन फूट अंतर राखून राहिलो तर कोरोनावर मात करणे शक्य आहे.
- डॉ. श्रीनिवास तौर, बालरोगतज्ज्ञ
तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आढावा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.