औरंगाबाद : कोरोनाचे संकट अजुन पूर्णपणे टळले नाही तरीही अनेकजण मास्क न वापरता फिरत आहेत. यामुळे प्रशासनाने मास्क न वापरता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. मे महिन्यापासून आतापर्यंत महापालिकेने अशा तब्बल १० हजार ९०३ जणांना दंड ठोकला आहे. या सर्वांकडून तब्बल ५४ लाख रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. शहरात मार्चमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाला. एप्रिलपासून कोरोनाचे संक्रमण अधिक वाढले. यामुळे सर्वांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क न घालणाऱ्यांना महापालिका प्रत्येकी ५०० रुपये इतका दंड आकारत आहे.
१ मे पासून महापालिकेने ही कारवाई तीव्र केली. शहरात रोज ५० ते १०० लोकांना दंड केला जात आहे. तरीही अनेकजण बेफिकीरपणे वागत आहेत. अजूनही काही भागात मास्क न घालताच लोक घराबाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे महापालिका पथकांकडून होणाऱ्या दंडात्मक कारवायाही वाढल्या आहेत. १ मेपासून १९ डिसेंबर पर्यंत साडे सात महिन्यात महापालिकेच्या पथकाने तब्बल १० हजार ९०३ लोकांना मास्क न घातल्याने दंड ठोकला आहे. त्यांच्या प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे ५४ लाख ५१ हजार पाचशे रुपये इतका दंड वसूल झाला आहे.
Edited - Ganesh Pitekar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.