औरंगाबाद : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आपल्या राज्यालाही या कोरोनाचा विळखा बसला आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने पूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे.
रात्रीची वेळी घरात आजारी माणूस असेल किंवा अचानक कोणाला रुग्णालयात न्यायची वेळ आली; तर त्यांच्या तत्परसेवेसाठी जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेमार्फत मोफत वाहन उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष संजय हळनोर यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगीतले.
हेही वाचा- कोरोनाच्या सावटात गुडीपाडवा साजरा
सध्या संचारबंदीच्या काळात रुग्णांना रात्रीच्या वेळी दवाखान्यात नेण्यासाठी वाहन मिळत नाही. रस्त्यावर दूरवर ऑटोरिक्षाही दिसत नाही. मग काय करणार? अशी वेळ कुणावरही येऊ शकते. अशी परिस्थिती निर्माण झाली तर तत्काळ मदत देण्यासाठी जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे.
हेही वाचा - कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात
रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत या संस्थेमार्फत शहरातील प्रवासी वाहन चालकांच्या मदतीने रुग्णांसाठी मोफत ऑटोरिक्षा, कार, जीप व एंबुलेंस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सामाजिक संस्थेमार्फत औरंगाबाद शहरातील गरजू रुग्णांना दवाखान्यात नेण्यास मदत केली जात आहे. शहरातील प्रत्येक भागातील रुग्णांना ही सेवा मिळावी म्हणून त्या-त्या भागातील रिक्षाचालकांचे मोबाईल नंबर देण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी किंवा अपरात्री शहरातील विविध भागात तत्पर सेवा देण्याऱ्या संघटनेच्या समन्वयकांचे मोबाईल नंबर देण्यात आले आहेत.
-
तत्परसेवेसाठी मोबाईल नंबर ः
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.