औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लग्न समारंभासाठी होणारी गर्दी रोखावी लागेल. ५० जणांची मर्यादा मंगल कार्यालयांना ठरवून दिली आहे. या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालयांना १० हजार रुपयांचा दंड लावण्यात यावा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चाचण्या वाढवा, अशा सूचना सोमवारी (ता. २२) महापालिका कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
कोरोना संसर्ग रोखणे, तसेच लसीकरणाबाबतची आढावा बैठक सोमवारी अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह वॉर्ड अधिकारी, आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी श्री. नेमाने यांनी सांगितले की, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे, जास्तीत जास्त आरटीपीसीआर कोरोना चाचण्या करणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशा सूचना नेमाने यांनी केल्या.
डॉ. नीता पाडळकर यांनी लग्न समारंभासाठी ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त गर्दी आढळून आल्यास दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात यावा. मंगलकार्यालय, लॉन्स, हॉटेल्स, सिनेमा हॉल, धार्मिक कार्यक्रमांची ठिकाणे, उद्याने, मॉल्स, रेस्टॉरंट याठिकाणी मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे आणि सॅनिटायझरचा वापर न करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
Edited - Ganesh Pitekar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.