औरंगाबाद जिल्ह्यात मध्यरात्री शेतकऱ्याच्या अडीचशे कोंबड्या मृत

bird flu
bird flu

औरंगाबाद: बेलखेडा येथील तरुण शेतकरी कुंजीलाल ईश्वर चव्हाण  याने शेतीला जोडधंदा म्हणून काही तरी करावे म्हणून मोठ्या जोमाने कुक्कुटपालन व्यवसाय सुरु केला होता. आपल्या भोपेवाडी शिवारातील धनगरवाडी गावाजवळील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसमोरील गट क्रमांक पाच मधील शेतात हा व्यवसाय सुरू केला होता. रात्री अचानक त्यांच्या अडीचशे कोंबड्या मृत पावल्या आहेत.

व्यवसायासाठी या तरुण शेतकऱ्याने शेड तयार करण्यासाठी 80 हजार रुपये खर्च करून त्यामध्ये क्रॉस गावरान जातीचे 250 कोंबडीचे पिल्ले व त्यांचे खाद्यपदार्थ तसेच खाद्यपदार्थ खाण्याचे भांडे  तीन महिन्या पूर्वी विकत आणले होते.

त्यासाठी हया शेतकऱ्यांने 70 हजार रुपये खर्च करून हया कोंबड्याना वाढीस लावले होते. सर्व खर्च जवळपास दीड लाख रुपयांचा खर्च केला होता. परंतु रात्री उशिरा अचानक सर्व कोंबड्या मरण पावलेल्या अवस्थेत सकाळी शेतकऱ्याला दिसले.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com