
farmer story chhatrapati sambhaji nagar
esakal
राज्यात हातात आलेलं पिक पाण्यात बुडालं. शेतकऱ्यांसमोर दोन घास जेवणाचा प्रश्न उभा राहिला. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे भयानक परिस्थिती आहे. सरकार पंचनामे करेल, ठीक आहे, पण त्याची मदतही काही वेळा मिळत नाही. मात्र शेतकरी कर्ज घेऊन, उसनवारी करून शेती करतो. पण निसर्गाचा कोप होतो.. अशावेळी त्याला साथ पाहिजे शासनाची, पण ती दिसत नाही. हा इतिहास आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेतकऱ्यांची परिस्थिती जैसे थे आहे... आता पिकं काढणीला आली असताना पावसाने हाहाकार माजवला. मातीतून उगवलेले सोयाबीन पुन्हा मातीत गेलं... पण याचा हिशोब कोण देणार? निसर्गाच्या विरोधात तर कोर्टात जाता येणार नाही. पर्याय आहे शासनाच्या मदतीचा...