

MLA Prashant Bamb announced key relaxations in the Farmer Loan Waiver Scheme 2026 to ensure benefits reach every eligible farmer.
Sakal
राजेंद्र व्यास,
गंगापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ मधील अनेक अटी शिथिल व रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकरी बांधवांनाही आता कमाल २ लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ५६ लाखांहून अधिक शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.