कर्जमुक्तीची घोषणा तत्काळ करा - राजू शेट्टी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

माजलगाव (जि. बीड) - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे शेतकरी विरोधी धोरणाचा पुरस्कार करणारे असून, त्यांनी अनेक विरोधी करार केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी एकजुटीने या सरकारच्या धोरणांचा पाडाव करणे गरजेचे आहे. राज्यातील महाराष्ट्र आघाडी सरकारने तत्काळ कर्जमुक्तीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. 

ऍड. रामराव नाटकर यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (ता. 16) आयोजित ऍड. रामराव नाटकर बळिराजा पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर वस्त्रोद्योग मंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश काळे, माजी आमदार मोहनराव सोळंके, राजेंद्र जगताप, अमित नाटकर, ऍड. गोले, संदीप जगताप, मोहन गुंड, पूजा मोरे, अमोल हिप्परगे आदी उपस्थित होते.

यावेळी शेतकरी नेते इक्‍बाल पेंटर, डॉ. उद्धव घोडके यांना ऍड. रामराव नाटकर यांना बळिराजा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्री. शेट्टी म्हणाले, की ऍड. रामराव नाटकर यांनी चार दशकांत जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी चळवळ जिवंत ठेवून आयुष्यभर केलेला संघर्ष तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे.

येत्या आठ जानेवारी 2020 ला प्रादेशिक व्यापक भागीदारी करार रद्द करून शेतमालाला दीडपट हमीभाव, सरसकट कर्जमुक्ती, शेतकरी विरोधी धोरणाविरोधात ग्रामीण भारत बंदची देशव्यापी हाक दिली असून, या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. शेट्टी यांनी केले. यासाठी कुलदीप करपे, धम्मानंद साळवे, अमित नाटकर, रामप्रसाद काळे, रामचंद्र डोईजड आदींनी पुढाकार घेतला. 

सोळंकेंकडून एक लाखाचा धनादेश 
माजी आमदार मोहनराव सोळंके यांनी या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी कायम संघर्ष करणाऱ्या स्वाभिमानी संघटनेला मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश खासदार राजू शेट्टी यांच्याकडे सुपूर्द केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com