

Hailstorm and Strong Winds Hit Ardhapur
Sakal
नांदेड : अर्धापूर, ता. १९ रोजी जिल्हा नांदेड येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असून केळी, टरबूज खरबूज, गहू अंबा व भाजीपाला पिकांना खुप मोठा फटाका बसला आहे.या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करित आहेत.