

The decision is expected to make travel easier and safer for thousands of pilgrims travelling to and from Pandharpur.
शेंदुरवादा : आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या तसेच परतीच्या प्रवासातील वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांनी हात दाखविलेल्या ठिकाणी एसटी बस थांबवून त्यांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश महामंडळाने राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहेत.