औरंगाबाद रेल्वे अपघात : न सांगताच निघाले, जिवानिशी गेले... 

अपघातस्थळी पाहणी करताना पोलिस.
अपघातस्थळी पाहणी करताना पोलिस.

जालना -  बदनापूर- करमाड दरम्यान मालगाडीने चिरडलेले १६ कामगार जालना येथील औद्योगिक वसाहत येथील दोन स्टील कंपन्यांमधील असल्याची माहिती, पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी दिली आहे. जिल्ह्यातून बाहेर जाण्यापूर्वी या कामगारांनी जिल्हा प्रशासन किंवा स्टील कंपनी प्रशासनाला कोणतीही कल्पना दिली नव्हती, असे सांगण्यात येत आहे. 

लॉकडाउनमुळे जालना स्टील उद्योग मागील दीड महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे अनेक परराज्यातील कामगार मिळेल त्या वाहनासह पायी आपल्या राज्याकडे निघाले आहेत. त्यात गुरूवारी (ता.सात) मध्य प्रदेशातील २६ जिल्ह्यांतील कामगारांसाठी औरंगाबाद येथून रेल्वे सुटणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जालना येथील दोन स्टील कंपन्यांमध्ये काम करणारे मध्यप्रदेशातील उमरिया, शहादौल या जिल्ह्यातील १९ कामगार जालना येथून रेल्वेरूळाने औरंगाबादकडे पायी निघाले होते.

दरम्यान ४० ते ४५ किलोमीटर चालल्यानंतर हे कामगार रेल्वेरुळावरच झोपल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, शुक्रवारी (ता.आठ) पहाटे बदनापूर- करमाड दरम्यानच्या सटाना पाटी शिवारात मालगाडीने रेल्वेरुळावर झोपलेल्या १६ कामगारांना चिरडले. तर तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

हे १६ कामगार जालना औद्योगिक वसाहत येथील पोलाद आणि एसआरजे स्टील कंपन्यांमधील असल्याची प्राथमिक माहिती पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी दिली आहे. तसेच या कामगारांनी जिल्हाच्या बाहेर जाण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती, असे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे. 

दरम्यान हे कामगार पोलाद स्टीलचे दोन आणि एसआरजे स्टील कंपनीचे असल्याचा दुजोरा दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकांनी दिला. व्यवस्थापनाला कोणतीही कल्पना न देता निघाले होते, असे सांगितले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com