
माणिकनगर : आठ दिवसांपासून ऐन दहावी-बारावीच्या परीक्षेच्या दरम्यान केऱ्हाळा येथील बसस्टँडवरील तिन्ही रोहित्र जळाल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले असून यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासाची गैरसोय होत आहे. महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे हा प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
केर्हाळा (ता.सिल्लोड) येथील गेल्या पाच ते सहा महिन्यापासून शेतातील २५ केव्ही थ्रीफेज वीजपुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर जळाले होते. शेतातील विजेचा भार वाढल्याने संबंधित स्थानिक वायरमन पांढरे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ६३ केव्ही थ्रीफेज ट्रान्सफॉर्मर मागणीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविला होता.
वरिष्ठांनी बांबर्डे ट्रांसफार्मरसाठी नवीन ६३ केव्ही थ्रीफेज ट्रान्सफॉर्मर मंजूर केले. परंतु मंजूर असलेले ट्रान्सफॉर्मर अद्यापपर्यंत बसवण्यात आले नसल्याने व वेळोवेळी पाठपुरावा करूनही वरिष्ट कार्यालय दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांनी संतप्त व्यक्त केला आहे. ऐन दहावी-बारावीच्या परीक्षेच्या काळात बसस्थानक परिसरातील नागरिकांची, विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी कसरत होत आहे.
''बसस्टँडवरील जळालेले सिंगल फेज तिन्ही गट्टू उपलब्ध झाले असून ते उद्या बसवणार आहे. बांबर्डे डीपीवरिल ६३ केव्ही ट्रांसफॉर्मरबद्दल माहिती नाही. माहिती घेऊन लवकरच सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करतो.''
-सचिन बनसोड, महावितरण,विभाग उपअभियंता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.