छत्रपती संभाजीनगर - छत्रपती संभाजीनगरच्या छावणी भागातील विद्यादीप बालगृहात नऊ मुलींना पळून जावे लागले. या मुलींना बालगृहात छळ आणि कॉमन बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावणे याला कंटाळून या मुली पळून गेल्या होत्या. संपूर्ण राज्यात हे प्रकरण गाजले आणि यांचे पडसाद अधिवेशनातही उमटले.