

Chhatrapati Sambhajinagar
esakal
आडूळ: पैठण तालुक्यातील आडूळ परिसरावर भीषण जलसंकटाचे सावट गडद झाले असून, गावाची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पाझर तलावात अवघा एक टक्का पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जनावरांची तहान भागविण्यासाठी पशुपालकांना याच उरलेल्या पाण्यावर विसंबून राहावे लागत असून, पुढील आठ दिवसांत तलाव पूर्णपणे कोरडा पडण्याची भीती व्यक्त होत आहे.