

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: शहराच्या बहुप्रतिक्षित नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंगळवारी (ता. १७) मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. १९ मार्चरोजी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर जॅकवेलमध्ये पाणी घेण्यास उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर २२ किंवा २३ मार्चपर्यंत जॅकवेल पूर्ण भरल्यानंतर हे पाणी मुख्य जलवाहिनीमध्ये सोडण्याचे आदेश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी दिले आहेत.