Aurangabad : पाइपलाइनचा दहा किलोमीटरचा टप्पा पूर्ण

दोन किलोमीटरचे पाइप तयार
Pipeline
Pipeline esakal

औरंगाबाद : नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार कामाची गती वाढत असून, मुख्य जलवाहिनीच्या कामाने आत्तापर्यंत दहा किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे, तर दोन किलोमीटरचे पाइप तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहरासाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा प्राधिकरणाने हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंपनीला दिली आहे.

मात्र हे काम संथगतीने सुरू असल्याने वादात सापडले होते. योजनेच्या कामाचे कार्यारंभ आदेश देऊन दोन वर्ष उलटले आहेत. पण कोरोना संसर्गाच्या काळात योजनेचे काम संथगतीने सुरू होते. दरम्यान कामाबद्दल उच्चन्यायालयाने लक्ष घालणे सुरु केल्यावर कामाला गती प्राप्त झाली.

सध्या ३९ किलोमीटरपैकी दहा किलोमीटर सहाशे मीटर एवढे मुख्य पाइपलाईनचे काम झाले आहे. १८०० मीटरचे रेडिमेड पाइप प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेले पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पाइप टाकण्याचे काम अखंड सुरु राहणार आहे. त्यासोबतच हेडवर्कसाठी जायकवाडी धरणात ॲप्रोचब्रीज तयार करण्याचे काम देखील सुरु आहे.

त्यासाठी बारा ठिकाणी कॉलमसाठी खोदकाम केले जात आहे. खोदकाम झाल्यावर स्टील बांधणी आणि काँक्रिटींगचे काम केले जाणार आहे, शहरांतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती वारंवार आढावा घेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com