औरंगाबाद : पाणिटंचाईच्या मुद्यावर आज शहरात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांसह नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणार सहभाग नोंदवला. दरम्यान या मोर्चाच्या वेळी शहरात लावण्यात आलेल्य़ा बॅनर्सवरून शिवसेना-भाजपमध्ये एक नवा वाद सुरू झाला आहे. (bjp jal aakrosh morcha)
भाजप शिवसेना वाद नव्याने पेटण्याची शक्यता आहे, शिवसेनेकडून आम्ही पाणीपट्टी आर्ध्यावर आणलीय तुम्ही गॅस सिलेंडरचे भाव आर्ध्यावर आणणार करणार काय? असा सवाल शिवसेनेकडून या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला होता. तर भाजपने शहरात जलआक्रोश मोर्चाचे बॅनर लावले आहेत, याच्याच बाजूलाच शिवसेनेने गॅस दरवाढीवरून प्रश्न विचारत हे बॅनर लावले होते, ते बॅनर अज्ञात भाजप कार्यकर्त्यांनी फाडल्याचे समोर आले आहे.
सेना आणि भाजप यांच्यात बॅनर युध्द सुरु आहे. महात्मा फुले चौक ते सांस्कृतिक मंडळापर्यंत मोर्चाच्या मार्गावर असलेले बॅनर अज्ञात कार्यकर्त्यांनी फाडले आहेत. दरम्यान यापुर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील भाजपचे बॅनर फाडले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान भाजपकडून बॅनर फाडण्यात आल्यानंतर यावर शिवसेनेची भूमिका काय असेल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.