

Chhatrapati Sambhajinagar
esakal
आडूळ: आता आमचं वय झालंय... आम्ही चालायचं कसं अन् पाणी शोधायचं कुठं... विकत पाणी घ्यायचं म्हटलं, तर एका ड्रमसाठी ७० रुपये मोजावे लागताय... ते पैसे आणायचे कुठून... अशी व्यथा ६५ वर्षांहून अधिक वय असलेल्या राधाबाई यांनी मांडत पैठण तालुक्यातील ब्राह्मणगाव तांडा येथील पाणीटंचाईच्या भयंकर वास्तव्यावर बोट ठेवले. ब्राह्मणगाव तांडा येथील ग्रामस्थांचे जनजीवन या पाणीटंचाईमुळे विस्कळित झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह चिमुकल्यांनाही रोज दोन ते तीन किलोमीटरवर पायपीट करावी लागत आहे. तळपत्या उन्हात केवळ दोन घागरी पाण्यासाठी सुरू असलेली ही जीवघेणी धडपड पाहून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.