औरंगाबाद : केरळमध्ये ३० जानेवारीला वुहानमधून परतलेली वैद्यकीय शाखेची विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह निघाली. त्यानंतर तेथील शासन अत्यंत गंभीर झाले. त्यांनी लगेच सीमा सील केल्या. आपत्ती घोषित केली. समूह क्वारंटाइनपासून सर्व उपायांना सुरवात केली. आज अख्ख्या केरळ राज्यात कोरोनाचे औरंगाबाद शहरापेक्षाही कमी म्हणजे ५३४ रुग्ण आहेत व मृत्यूही चार झाले आहेत.
महाराष्ट्राचे आकडे सोडाच; पण औरंगाबादने केरळला मागे टाकले. आज (ता. १४) जिल्ह्यात ७४७ पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू २० झाले आहेत. अर्थात येथील प्रशासन, अपुरी साधने, उपाययोजना, डाऊन झालेले लॉक आणि नागरिक यांच्यावरही जबाबदारी जाते.
शक्यतेवर ट्रेसिंग अवलंबून!
टास्क फोर्सची स्थापना २४ एप्रिलला झाली. सुरवातीच्या दिवसांत ट्रेसिंगचे प्रमाण ७० एवढे होते. पण २७ एप्रिलनंतर शहरात उद्रेक झाला, तो आजपर्यंत कायम असून आता ठराविक भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केवळ शक्यतेवरच अवलंबून आहे. एक बाब ही की, बाधित रुग्ण प्रशासनाच्या नजरेस येत आहेत. पण त्यातील काही शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात भरती होत आहेत, हीच चिंतेची बाब आहे.
जाणून घ्या - नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही...
कोरोनाविरोधी लढ्याची सुरवातच अडखळत
हेही वाचा - औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना
लॉकडाउननंतर औरंगाबाद...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.