कर्जमाफीचे निकष पूर्ण करणाऱ्या 1 लाख 81 हजार शेतकऱ्यांची माहिती आहे तयार, दोन दिवसात होणार पोर्टलवर अपलोड

mahatma fule shetkari karjmafi yojna.jpg
mahatma fule shetkari karjmafi yojna.jpg
Updated on

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारतर्फे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी एक ते 28 रकान्यांतील माहिती भरण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू आहे. यात आतापर्यंत एक लाख 81 हजार 518 शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती तयार करण्यात आली आहे. तर अद्यापही बॅंक खात्याला आधार जोडणी व रकान्यातील माहिती न भरणाऱ्यांची संख्या ही सात हजारांवर असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. 

राज्य सरकारतर्फे राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्‍ती देण्यात येणार आहे. यासाठी बॅंकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या एक ते 28 या रकान्यांत माहिती भरून घेण्यात येत आहे. ही माहिती 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष बॅंकांना देण्यात आलेले आहे. त्यानुसार बॅंकांतर्फे युद्धपातळीवर ही कामे केली जात आहे. 13 राष्ट्रीयीकृत बॅंका, जिल्हा मध्यवर्ती बॅंक आणि महाराष्ट्र ग्रामीण बॅंक यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया जिल्ह्यात सुरू आहे. एक फेब्रुवारीला पोर्टल आल्यानंतर बॅंकांतर्फे जमा झालेली एक ते 28 रकान्यांतील माहिती यावर अपलोड केली जाईल. त्यानंतर शासनाकडून ही माहिती पुन्हा बॅंकांकडे पाठविण्यात येईल. त्यानुसार बॅंकांतर्फे आलेली यादी गावातील ग्रामपंचायत तसेच चावडी आणि बॅंकेत लावण्यात येईल. लाभार्थी शेतकरी यादीनुसार आलेली रक्‍कम तपासणी करेल. त्यानंतर रक्‍कम बरोबर असल्यानंतर मान्य असल्याची माहिती बॅंकेला देईल. मान्य असणाऱ्यांच्या खात्यात ही रक्‍कम ऑटोमॅटिक जमा होणार आहे. मात्र यासाठी सर्वांत आधी कर्जदार शेतकऱ्यांनी आपले आधार अपटेड करणे गरजचे आहे. 29 जानेवारी अखेर 1 ते 28 रकान्यांत माहिती भरणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा 1लाख 81 हजार 518 झाला आहे. तर 77 हजार 539 शेतकऱ्यांनी आधार जोडलेले आहे. याशिवाय आधार न जोडलेले 70 हजार 69 शेतकऱ्यांनी अद्याप आधार जोडलेले नसल्याचे माहिती सुत्रांनी सांगितली. 

जिल्हाधिकारी कार्यालयाचा पुढाकार 
जिल्ह्यात तहसील कार्यालयात आधार केंद्र असणार आहे. जिल्ह्यातील 15 ते 18 हजार लाभार्थ्यांचे आधार हे बॅंकेशी जुळताना अडचणी येत आहे. हातावरील रेषा, इतर तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे या शेतकऱ्यांना बॅंक खात्याला आधार जोडणी होत नव्हती. यामुळे जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी जिल्हाधिकारी यांना विनंती केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आता प्रत्येक तहसीलच्या ठिकाणी आधार अपटेड यंत्रणा सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com