Aurangabad
AurangabadEsakal

Aurangabad: नामांतर शहराचं की जिल्ह्याचे? विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न अन् उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर!

उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरणास केंद्र सरकारकडून मंजुरी

उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली. संबधित नावावरुन नवा संभ्रम निर्माण झाला आहे. धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ही नावे फक्त शहराची बदलली गेली आहेत, की संपूर्ण जिल्ह्याचेच नामकरण होणार आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अशातच ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंबधीचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विट करत "हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणं अपेक्षित असल्याचे म्हंटले आहे." तर अंबादास दानवे यांच्या या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत, त्यांना संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली आहे.

अंबादास दानवे यांचा प्रश्न

"हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा. ता. 'छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद', असे यापुढे लिहावे लागेल का? हे पण सांगावे." असं ट्वीट विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे. दानवे यांनी हे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टॅग केलं आहे. दरम्यान, अंबादास दानवेंच्या या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं ट्विट शेअर करत उत्तर दिलं आहे.

Aurangabad
Kasba Byelection : रवींद्र धंगेकर उद्या कसबा गणपती मंदिराबाहेर उपोषणाला बसणार

उत्तर देताना काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"अंबादास जी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते. तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' असे नामकरण झाले आहे. त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल. तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही" असं ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांनी अंबादास दानवे यांच्या प्रश्नावर उत्तर देत नामांतराची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली आहे.

Aurangabad
Aurangabad: नाव बदललं तरी उल्लेख 'औरंगाबादच' करावा लागेल; तांत्रिक बाजू समजून घ्या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com