

Eknath Shinde farmer loan waiver announcement Jevali rally
sakal
जेवळी : सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार अन्नदात्या शेतकऱ्यांचा असून, आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही घेणारे नाही, तर देणारे आहोत. महायुतीच्या वचनाम्यातील आश्वासनाप्रमाणे कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात आली असून, समितीचा अहवाल येताच निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठा दिलासा देणार आहोत, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. जेवळी (ता. लोहारा) येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.