औरंगाबाद : नाथसागरात सध्या ५२ टक्के साठा

तीव्र उन्हामुळे वाढला बाष्पीभवनाचा वेग
Nathsagar dam
Nathsagar damSakal

पैठण - यंदा उष्णतेच्या झळा तीव्र झाल्याने जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणामधील पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून नाथसागर धरणातून टप्याटप्याने पाण्याचा शेती सिंचन, औद्योगिक व पिण्याच्या पाण्यासाठी वापर करण्यात येत आहे. सद्यस्थितीत नाथसागर धरणात ५२.६१ टक्के साठा शिल्लक आहे. नाथसागर धरणातून विविध शहरांना पिण्यासाठी व वाळूज , शेंद्रा , पैठण , जालना औद्योगिक वसाहतीसाठी दररोज ०२८९ दलघमी एवढा पाणीपुरवठा होत आहे. धरणात सध्या ५२.६१ टक्के साठा आहे. नाथसागराची पातळी १,५२१ फूट आहे. आजपर्यंत मागील वर्षी ५१.४० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. तसेच मागील दोन महिन्यांपूर्वी ता. २८ फेब्रुवारी २०२२ मध्ये ७७.९९ तर ता. ३१ मार्च २०२२ रोजी ६५.७० टक्के पाणीसाठा होता.

दरम्यान, मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने सप्टेंबरमध्येच नाथसागर धरण १०० टक्के भरले होते . दरम्यान , यावर्षी वाढते तापमान व पाण्याची मागणी याचा विचार करता पाण्याचा वापर काटकसरीने करावा , असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागीय अभियंता ज्ञानदेव शिरसाठ, धरण अभियंता विजय काकडे, पाणी पातळी मोजणीदार गणेश खराडकर, अब्दुल बारी गाजी यांनी केले आहे.

तीव्र उन्हामुळे बाष्पीभवनाचा दर कमालीचा वाढला असून, तो १.५५ मिमी अशा उच्चांकीस्तरावर पोचला आहे . त्यामुळे धरणसाठ्यातील पाणीपातळी खालवत आहे. बाष्पीभवनाचा दर एप्रिल महिन्यात वाढला आहे. परिणामी धरणातील पाणी साठा कमी होत आहे.

- विजय काकडे, धरण अभियंता, नाथसागर, पैठण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com