

Chhatrapati Sambhajinagar
esakal
घाटनांद्रा: उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागातील रानमेव्याची ओढ पुन्हा एकदा वाढली आहे. डोंगरदऱ्यांतील आंबट-गोड चवीची डोंगरची ‘काळी मैना’ अर्थात, करवंद अखेर घाटनांद्रा येथील बाजारात मे महिन्यात दाखल झाली आहेत.
मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून, या रानमेव्याला महागाईची झळ बसली आहे. बाजारात करवंदांची विक्री १८० ते २०० रुपये प्रतिकिलो दराने होत असली, तरी ग्राहकांची मागणी मात्र कायम आहे.