

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: हर्सूल कारागृह ते जटवाडा या चारपदरी सिमेंट रस्त्याचे काम वर्षभरापासून सुरू असले तरी नियोजनशून्य कारभारामुळे हा मार्ग आता थेट ‘धोक्याचा सापळा’ ठरत आहे. रस्त्याचे काम अर्ध्यावर आले असतानाही न्यू होनाजीनगरजवळ मध्यभागी उभे असलेले विजेचे खांब हटवले गेलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.